सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हा सिनेमा देशातील सर्वच राज्यात होणार रिलीज होणार आहे. भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.
काय म्हणाले कोर्ट?
‘जर राज्य या सिनेमावर प्रतिबंध लावत आहेत तर ही भारतीय व्यवस्थेवर हल्ला आहे. हा गंभीर विषय आहे. जर कुणाला याबाबत समस्या असेल तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात. राज्य सिनेमाच्या कथेला हात लावू शकत नाहीत’. आणि चित्रपटाला सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे आणि ती त्यांनी पार पाडायला हवी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत.

No comments:
Post a Comment