संपुर्ण भारतात बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गात विखूरला आहे. ज्याची लोकसंख्या 15 कोटी आहे. आज भारतात 100 खासदार 400 आमदार हे बंजारा समाजाच्या लोकसंख्येवर निवडून येतात. आज तेलंगाणा, कर्नाटकामध्ये बंजारा समाजाच्या मतावर सरकार स्थापन झाले आहे. पण समाजाच्या समस्या व त्यांच्या विकासासाठी कोणतेही सरकार लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. पण आता हे चालणार नाही. आज बंजारा समाज अनेक समस्यांना तोंड देत आहे हे थांबविण्यासाठी समाजात राजनितीक चेतना जागृती आम्ही करत आहोत. त्यासाठी दक्षिण भारत महाराष्ट्र और मध्य भारत मध्ये बंजारा सेवालाल समिती स्थापन केली आहे. या समितीद्वारे आम्ही भारतभर जनजागृती रथयात्रा काढणार आहोत. आज जो पक्ष बंजारा समाजाला महत्व देईल तेच पक्ष सत्ता स्थापन करेल.
76 वर्षाच्या स्वतंत्र भारतात बंजारा समाजाच्या स्थितीची सुधारणा झाली नाही. जो पक्ष बंजारा समाजाच्या विकासासाठी कार्य करेल त्याच्या सोबतच बंजारा समाज काम करेल हा निर्णय आम्ही घेत आहोत.
आमच्या प्रमुख मागण्या :-
1) बंजारा ज्या राज्यात एस.सी., एस.टी. मध्ये नाही त्या राज्यात बंजाराला त्याचा दर्जा दयावा.
2
) बंजारा तांड्याचा महसूली दर्जा नसल्यामुळे त्या तांड्यावर कोणत्याही सुविधा नसल्यामुळे तांड्याला महसूली दर्जा दयावा.
3)
बंजारा तांडा विकासासाठी निधी देण्यात यावे.
4)
बंजारा भाषा गोर बोलीचा विकास करण्यासाठी बंजारा बोलीला संविधानाच्या 8 व्या सुचीमध्ये समाविष्ट करावे.
5)
बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय उत्सव जाहीर करून शासकिय सुट्टी देण्यात यावी.
7) देशात शांतीचा संदेश देणारे व बंजारा समाजाच्या विकासासाठी काम करणारे राष्ट्रीय
संत रामराव महाराज यांना भारतरत्न दयावे.
8)
हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव फुलसिंग नाईक यांना भारतरत्न द्यावे.
9) हैद्राबाद येथील बंजारा हिल मध्ये संत सेवालाल महाराज यांचा पुतळा स्थापन करावे व बंजारा समाजाची आस्था माता जगदंबा यांची भव्य मंदिर निर्माण करावे.
No comments:
Post a Comment