बॉलिवूडचा 'दबंग' सलमान खानने त्याच्या 'बिईंग ह्यूमन' संस्थेमार्फत वीरजवानांच्या कुटुंबियांना मदत केली आहे. यापूर्वी 'बिग बी' अमिताभ बच्चन यांनीदेखील जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखाची मदत जाहीर केलीय. 'उरी' सिनेमाचे निर्माते रोनी स्क्रुवाला यांनीदेखील १ कोटी रुपयांची मदत दिली आहे. आता सलमान खाननेही त्यांच्यासाठी पुढाकार घेतला आहे.
सलमानने आपली मदत इतरांप्रमाणे सोशल मीडियावर जाहीर न करता केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यामार्फत थेट 'भारत के वीर' या नावाने सुरू करण्यात आलेल्या अकाऊंटमध्ये जमा करण्याचा निर्णय घेतलाय. याबाबत किरेन यांनी सलमानचे कौतुकही केले आहे.
सलमानची ही मदत 'भारत के वीर' या अकाऊंटद्वारे वीर जवानांच्या कुटुंबियापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे किरेन रिजिजू यांनी सांगितले आहे.
Thank you @BeingSalmanKhan on offering to contribute for Pulwama Martyrs through BEING HUMAN FOUNDATION. I'll work out for handing over of the cheques in the account of #BharatKeVeer @BharatKeVeer
2,634 people are talking about this


No comments:
Post a Comment