व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Friday, 26 January 2018

राहुल गांधींना सहाव्या रांगेत बसवल्यामुळे काँग्रेस नाराज

रणदीप सुरजेवाला यांचा मोदींविरोधात ट्विट


दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा उत्साहपूर्ण सोहळा शुक्रवारी पार पडला. या सोहळ्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत बसवण्यात आल्याने काँग्रेसने नाराजीचा सूर आळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हीन पद्धतीचे राजकारण करत आहेत असा आरोप आता यावरून काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान आणि त्यांचे हीन राजकारण आता जगासमोर आले आहे हेच त्यांच्या या कृतीतून दिसते असेही काँग्रेसकडून म्हटले गेले आहे.
अशात मला जागेची किंवा रांगेची चिंता नाही असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अॅट होम या कार्यक्रमातही मी बाबत काहीही भाष्य केले नव्हते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आयोजित केलेल्या अॅट होम या कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना दुसऱ्या रांगेत स्थान देण्यात आले तर प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात त्यांना सहाव्या रांगेत स्थान देण्यात आले. यावर काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मोदी सरकार की ओछी राजनीति जग ज़ाहिर!

कांग्रेस अध्यक्ष श्री राहुल गांधी को गणतंत्र दिवस के राष्ट्रीय पर्व पर अंहकारी शासकों ने सारी परंपराओं को दरकिनार करके पहले चौथी पंक्ति और फिर छठी पंक्ति में जानबूझकर बिठाया।

हमारे लिये संविधान का उत्सव ही सर्व प्रथम है।
प्रजासत्ताक दिन संचलन कार्यक्रमात सहाव्या रांगेत बसून राहुल गांधी गुलाम नबी आझाद यांच्यासोबत चर्चा करताना दिसले. यावेळी काही लोकांनी राहुल गांधी यांच्यासमवेत सेल्फीही काढले. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात मोबाइल आणण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासोबत काही लोकांनी सेल्फीही काढले. मात्र राहुल गांधी यांना सहाव्या रांगेत स्थान देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हीन दर्जाचे राजकारण आहे अशी टीका काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली. काँग्रेस विरोधी पक्षात आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पहिल्या रांगेत स्थान दिले जाते ही परंपरा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही परंपरा मोडली असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जाणीवपूर्वक सहाव्या रांगेत बसवण्यात आले. त्यानंतर त्यांना चौथ्या रांगेत बसवले गेले. उद्धट सत्ताधाऱ्यांचे हे वर्तन अशोभनिय आहे असेही सुरजेवाला यांनी म्हटले आहे. राहुल गांधींना देण्यात आलेल्या वागणुकीबाबत ट्विट करून त्यांनी निषेध नोंदवला आहे.

No comments:

Post a Comment