गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या प्रचाराचा धुरळा संपला असला तरी राजकीय नेत्यांचं एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान देणं अजूनही सुरूच आहे. 'सौराष्ट्र-कच्छमध्ये भाजपने किमान दहा जागा जिंकून दाखवाव्यात पटेलांसाठी सुरू केलेलं आरक्षण आंदोलन मागे घेईन,' असं आव्हान पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने भाजपला दिलं आहे.
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपण्यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यातील इदर टाऊनमध्ये आयोजित एका सभेत हार्दिकनं हे आव्हान दिलं. 'सौराष्ट्रामध्ये मी बऱ्याच दिवसांपासून प्रचार करत आहे. इथल्या लोकांमध्ये भाजपविरोधात असंतोष आहे. सौराष्ट्र-कच्छमध्ये एकूण ५४ जागा आहेत. या ठिकाणी भाजपनं दहा जागा जरी जिंकल्या तरी मी माझं आंदोलन मागे घेईन,' अशी भीष्म प्रतिज्ञा हार्दिकने केली.
यावेळी हार्दिकने अपक्ष उमेदवार किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करू नका, असं आवाहनही मतदारांना केलं. 'अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ही भाजपचीच माणसं आहेत. भाजप आणि काँग्रेस दरम्यानच मुख्य लढाई आहे. जर तुम्हाला भाजपला मतदान करायचं नसेल तर काँग्रेस हाच पर्याय असून काँग्रेसला मतदान करा,' असं आवाहनही त्याने केलं.
गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील प्रचार संपण्यापूर्वी साबरकांठा जिल्ह्यातील इदर टाऊनमध्ये आयोजित एका सभेत हार्दिकनं हे आव्हान दिलं. 'सौराष्ट्रामध्ये मी बऱ्याच दिवसांपासून प्रचार करत आहे. इथल्या लोकांमध्ये भाजपविरोधात असंतोष आहे. सौराष्ट्र-कच्छमध्ये एकूण ५४ जागा आहेत. या ठिकाणी भाजपनं दहा जागा जरी जिंकल्या तरी मी माझं आंदोलन मागे घेईन,' अशी भीष्म प्रतिज्ञा हार्दिकने केली.
यावेळी हार्दिकने अपक्ष उमेदवार किंवा राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करू नका, असं आवाहनही मतदारांना केलं. 'अपक्ष उमेदवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार ही भाजपचीच माणसं आहेत. भाजप आणि काँग्रेस दरम्यानच मुख्य लढाई आहे. जर तुम्हाला भाजपला मतदान करायचं नसेल तर काँग्रेस हाच पर्याय असून काँग्रेसला मतदान करा,' असं आवाहनही त्याने केलं.

No comments:
Post a Comment