व्हिडीओ बातमीपत्र पाहण्यासाठी youtub वर नमस्कार महाराष्ट्र या चॅनल ला subscribe करा 7798904000,7507103000 हे नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा
Subscribe to our channel for Latest News and updates in Marathi, Marathi News, Maharashtra News, Breaking News, Headlines, Latest News, Video, Marathi newspaper, marathi movie, sports news, international news, World News, crickets, Entertainment News, Bollywood, National News, Agriculture, Business, Politics News, Health, Science, Business, Exclusive News, Live TV, Photogallery, Blog, Poll, Opinion, मराठी न्यूज,नमस्कार महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्र न्यूज *अधिक जानकारी के लिये ,7507103000,7798904000, 9175730561 पर संपर्क कर सकते है...

Sunday, 11 February 2024

नांदेडमधील पाणीसाठा ५२ टक्क्यांपर्यंत खालावला


जिल्ह्यात सध्या कमाल तापमानात वाढ झाल्याने पाण्याचे बाष्पीभवन वाढले आहे. यासह शेतीसिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्यामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

सध्या एकूण १०४ प्रकल्पात ३८३.३५ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.६५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मागील वर्षी याच कालावधीत ४३४.०३ दलघमीनुसार ५९.६१ टक्के पाणीसाठा होता अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात झालेल्या पावसामुळे संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता.

यामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पांत समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. परंतु या उन्हाच्या तीव्रतेत वाढ झाल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. तसेच शेतीसिंचनासाठी पाणी पाळ्या देण्यात येत असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

आजघडीला जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात सध्या प्रकल्पात ४२.७४ दलघमीनुसार ४३.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ६०.६९ दलघमीनुसार ५२.९० टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पांत ५८.६४ दलघमीनुसार ४२.१७ टक्के पाणीसाठा आहे.

चार कोल्हापुरी बंधाऱ्यात २.७६ दलघमीनुसार ३७.११ टक्के पाणीसाठा आहे, ८० लघू प्रकल्पात १००.७० दलघमीनुसार ५८.२८ टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधाऱ्यात ११७.८१ दलघमीनुसार ६२.०७ टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पांत ३८३.३५ दशलक्ष घनमीटरनुसार ५२.६५ टक्के पाणी साठा शिल्लक आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ४१४.८० दलघमीनुसार ५१.२२ टक्के पाणीसाठा आहे. तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ४४.६७ दलघमीनुसार ५५.१७ टक्के पाणीसाठा आहे.

तसेच यवतमाळ जिल्ह्यातील ऊर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ६२३.३७ दलघमीनुसार ६४.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दरम्यान, मागील वर्षी याच कालावधीत ४३४.०३ दलघमीनुसार ५९.६१ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

नांदेड पाटबंधारे मंडळातील प्रकल्पनिहाय पाणीसाठा

प्रकल्प दलघमी टक्केवारी

विष्णुपुरी ४२.७४ ५२.९०

मानार ६०.६९ ४३.९१

मध्यम प्रकल्प (९) ५८.६४ ४२.१७

लघू प्रकल्प (८०) १००.७० ५८.२८

उच्चपातळी बंधारे (९) ११७.८० ६२.०७

को.प. बंधारे (चार) २.७६ ३७.११

एकूण प्रकल्प ३८३.३५ ५२.६५

जिल्ह्याशेजारील प्रकल्प

येलदरी ४१४.८० ५१.२२

सिद्धेश्‍वर ४४.६७ ५५.१७

इसापूर ६२३.३७ ६४.६६


No comments:

Post a Comment